श्रीमती नरसम्मा हिरय्या शैक्षणिक ट्रस्ट अमरावतीद्वारा संचालित सरस्वती शिशु वाटिका अमरावतीचा संस्कार वर्ग दि. 29 एप्रिलला संपन्न झाला. 15 दिवसांच्या या वर्गात रंग काम, हस्त कला, मातीची खेळणी तयार करणे, कथा, लाठी, तलवारबाजी योगासन, श्लोक, रामरक्षा, अथर्वशीर्ष पठन व विज्ञान प्रयोग घेण्यात आले. विशेष म्हणजे मलखांबचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
समारोप प्रसंगी शिशु वाटिकेतील विद्यार्थ्यांच्या आजी सौ.माधवी मोरोणे व सौ. पांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्त्या म्हणून प्रांत शिशु वाटिका प्रमुख श्रीमती निर्मलाताई महाजन यांनी शिशु वाटिकेच्या 12 शिक्षा व्यवस्थांची सविस्तर माहिती दिली व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिशु शिक्षा अनौपचारिक पद्धतीनी कशी आहे याबाबत माहिती सांगितली. जिल्हा अध्यक्ष मा. नरेंद्रजी धर्मळे यांनी वर्तमान परिस्थितीत माता पालाकंनी कसे जागृत राहावे याबाबत मार्गदर्शन केले. शिशु वाटिकेची माहिती प्रधानाचार्या सौ. रश्मी जुमळे यांनी सांगितली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रेवातीताई देशपांडे उपस्थित होत्या. विद्या भारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा.डॉ.श्रीकांतजी देशपांडे, संचालिका सौ. अनिताताई व्यवहारे, नागपूर महानगर शिशु वाटिका प्रमुख संध्याताई अग्निहोत्री प्रामुख्यानी उपस्थित होत्या. कार्यक्रमात प्राचार्य डॉ. चंदनपट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ. सारिका शेष, सौ.कल्याणी क्षीरसागर व सौ. कविता कस्तुरे यांनी परीश्रम केले. शांती मंत्रांनी कार्यक्रमाची सांगता झाली.



