परतवाडा दि.5 एप्रिल 2025
श्रीराम मंदिर सदर बाजार परतवाडा व विद्या भारतीचा उपक्रम
परतवाडा : – देशभरात चैत्र नवरात्रीच्या उत्सवाचा जल्लोष सुरू असताना विद्या भारती व स्थानिक श्रीराम मंदिर, सदर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने अष्टमी निमित्त 108 कन्यांचे विधिवत पूजन व भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी परतवाडा शहरातील शारदा कन्या शाळा व गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व पालकांची उपस्थिती होती. विद्यार्थिनींना भेटवस्तूही देण्यात आल्या.
कार्यक्रमात विद्या भारतीचे विदर्भ व देवगिरी प्रांत संघटन मंत्री शैलेश जोशी नागपूर, विलास राजकारणे नागपूर, विद्या भारती जिल्हा संपर्क प्रमुख प्रभाकर राऊत, प्रांत जनजाती शिक्षा प्रमुख हेमंत नवरे, संस्कार भारतीच्या सौ.अनुपमा खवसे, श्री. राम खवसे तसेच श्रीराम मंदिर संस्थानचे शामभैया खंडेलवाल, मुकुंदभैया अग्रवाल, शिल्प अग्रवाल, दीपकभैया अग्रवाल, गोविन्दभैया सिरोया, हरीभैया अग्रवाल, संकेत सिरोया, सौ.राधिका अग्रवाल, सौ.माधुरी मुकुंद अग्रवाल, राजेंद्र जयस्वाल, सौ.ममता देशमुख, सौ.नंदा वानखडे शारदा कन्या शाळा परतवाडा, सौ.शितल मोहोळ, शुभांगी गोहत्रे, उईके सर गर्ल्स हायस्कूल परतवाडा व पालक वृंद उपस्थित होते.
उपस्थित पालक व शिक्षकांना प्रबोधन करताना शैलेश जोशी म्हणाले की घराघरात सदस्यांचा आपापसातील संवाद जणू संपलाच आहे. येणाऱ्या काळात अनेक आव्हाने येणार आहेत. अशात आपली हिंदू संस्कृती टिकवायची असेल तर घराघरात आपसात संवाद होणे गरजेचे आहे. मुलांना मोबाईल पासून दूर ठेवणे आवश्यक आहे. बाल वयात संस्कृतीचे धडे गिरवणे अत्यंत महत्त्वाचे असते. या वयातच मुलांच्या बुद्धीचा अधिक विकास होत असतो. त्यामुळे याच वयात संस्कारही होणे अत्यंत गरजेचे आहे. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.

